।। हरि: ॐ ।।
‘अंबज्ञोऽस्मि’ ‘नाथसंविध्’ ‘अंबज्ञोऽस्मि’ का अर्थ है-मैं अंबज्ञ हूँ। अंबज्ञता का अर्थ है-आदिमाता के प्रति श्रद्धावान के मन में होनेवाली और कभी भी न ढल सकनेवाली असीम सप्रेम कृतज्ञता। (संदर्भ–मातृवात्सल्य उपनिषद्) नाथसंविध् अर्थात् निरंजननाथ, सगुणनाथ और सकलनाथ इन तीन नाथों की इच्छा, प्रेम, करुणा, क्षमा और सामर्थ्य सहायता इन पंचविशेषों के द्वारा बनायी गयी संपूर्ण जीवन की रूपरेखा। (संदर्भ–तुलसीपत्र १४२९)
Monday 28 September 2020
गाणी आणि आठवणी - १५ - मेंदीच्या पानांवर .....
गाणी आणि आठवणी - १५
प्रवास-योगी (Marathi)
Sunday 20 September 2020
मेरी रखवाली तुम ही हो माँ (Hindi)
।। हरि: ॐ ।।
मेरी रखवाली तुम ही हो माँ
आज मेरी माँ का जन्मदिन है। मेरी माँ ने मेरे लिए बहुत कुछ सहा है, मेरे लिए असीम त्याग किया है। आज मैं जो कुछ भी हूँ, वह मेरी माँ की मेहनत और आशीर्वाद से हूँ। माँ का प्यार अनन्त है, माँ के ऋण अनन्त हैं। माँ के लिए ईश्वर से निरामय आनन्दमय दीर्घायु की प्रार्थना करता हूँ और माँ के लिए आज लिखीं कुछ पंक्तियाँ प्रस्तुत कर रहा हूँ।आजी आजोबा माझ्यासाठी देवदूत (Marathi)
आजी आजोबा माझ्यासाठी देवदूत
आज माझ्या आईचा वाढदिवस, त्यानिमित्त तिच्या आईवडिलांचे म्हणजे माझ्या आजी-आजोबांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करून त्यांच्यावर लिहिलेल्या या काही ओळी. माझ्या रामभक्त आईसाठी प्रभु श्रीरामचन्द्रचरणी हीच प्रार्थना की माझ्या आईला निरोगी उदंड आयुष्य लाभो.
Saturday 19 September 2020
काट्यांची गजल (Marathi)
।। हरि: ॐ ।।
काट्यांची गजल
आज बर्याच वर्षांनी एका मित्राचा फोन आला. त्याचा आणि माझा गेल्या २७ वर्षांत काही संपर्क नव्हता. त्याला माझा नंबर मिळाला म्हणून त्याने फोन केला. त्याच्याकडून त्याच्या आयुष्याचा खडतर प्रवास कळला आणि आजही त्याच्या नशिबात काटे रुतणेच आहे हे त्याच्या बोलण्यातून जाणवले. त्याची जीवनाबद्दल किंवा कुणाबद्दल काही तक्रार नव्हती. मला त्याची व्यथा-वेदना ऐकून खूप वाईट वाटले. मी त्याला म्हटले की देवाकडे प्रार्थना करीन. देव करो आणि कुणावरही अशी परिस्थिती न येवो. मला धन्यवाद देत तो म्हणाला, आता काट्यांशीच मैत्री झाली आहे रे, काट्यांशिवाय करमणारच नाही. त्याचे हे वाक्य मनात खूप खोलवर रुतले आणि त्यानंतर सुचलेल्या या काही ओळी.
Monday 14 September 2020
संधिकाळ (Marathi)
।। हरि: ॐ ।।
संधिकाळ
शहरातल्या एका पर्वतशिखरावर ती आणि तो यांची एका संध्याकाळी भेट होते. ही त्या प्रेमिकांची अखेरची भेट असते. घरून त्यांच्या लग्नाला विरोध असल्याने ते दोघेही आज, ‘पुन्हा कधीच भेटता येणार नाही’, हे एकमेकांना सांगून एकमेकांचा निरोप घेण्यासाठी भेटत आहेत.
जर त्याच्याशी नाही तर कुणाशीच नाही हा तिचा निश्चय आणि जर तिच्याशी नाही तर कुणाशीच नाही हा त्याचा निश्चय. जर असं करायचं असेल तर तुम्ही एकमेकांना कधीच भेटायचं नाही हा घरच्यांचा निर्णय.
दोघेही एकाच क्षेत्रात कार्यरत असल्याने त्यांचा जीवनप्रवास समांतर रेषांप्रमाणे होणार आहे कारण एकमेकांच्या ऑफिसमध्ये जाणे, मीटिंग्समध्ये किंवा कॉन्फरन्सेसमध्ये एकमेकांसमोर येणे हे घडणार आहे, आसपासच्या मंडळींकडून एकमेकाच्या वाटचालीबद्दल कळणार आहे. अशा प्रकारे एकमेकांसमोर असूनही ते कधीच भेटणार नाहीत, जवळ असूनही समांतर रेषा एकमेकीला कधीच भेटत नाहीत, तसंच यांचंही होणार आहे.
त्यांच्या या निरोपाच्या घडीला त्यांच्या काळजातली वेदना निसर्गात उमटली आहे. पण सर्वकाही प्रतिकूल दिसत असूनसुद्धा वर स्वर्गात लग्नाच्या गाठी मारणारा तो निळा-सावळा प्रेमळ देव या दोघांचे प्रेम पाहून, त्यागाची तयारी पाहून यांच्या समांतर रेषांचे प्रारब्ध मिटवून त्यांच्या हस्तरेखा एकमेकांशी जुळवतो आहे. अर्थात् यांच्या प्रेमाची शोकान्तिका न होता सुखान्तिका होणार आहे.
त्या दोघांना वाटत आहे की ही विरहाची कातर संध्याकाळ आहे, पण त्यांच्या प्रेमामुळे विधात्याने त्यांचा ‘संधि’ म्हणजेच मिलन घडवून आणण्याचे ठरवून त्यांच्यासाठी हा संधिकाळ केला आहे.
Friday 11 September 2020
Wednesday 9 September 2020
Thursday 3 September 2020
कहानी नई पुरानी - ०२ - थॅंक यू कुणाल (काल्पनिक कहानी)